Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सतत बदलत असलेल्या तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या क्षेत्रातील काही व्यक्तींमध्ये संपूर्ण उद्योगक्षेत्राला नवा मार्ग दाखवण्याची क्षमता असते. आनंद माहूरकर हे या दुर्मिळ श्रेणीतील एक दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जातात, ज्यांनी आपल्या ध्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोनातून काही क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. (Findability Sciences) फाइंडॅबिलीटी सायन्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक म्हणून माहूरकर यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) उत्पादने आणि उपाययोजनांच्या क्षेत्रात ‘एन्टरप्राईज एआय’, आणि ‘बिझनेस प्रोसेस को – पायलट’ या उत्पादनांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर एक सामर्थ्यशाली कंपनी उभी केली आहे. हा प्रवास जिद्द, गहन अंतर्दृष्टी, सूक्ष्म दृष्टीकोन आणि भविष्य घडविण्याच्या कटिबद्धतेने प्रेरित होऊन झाला आहे.…

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रीमंडळ बैठकीतून करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत 2398 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. 2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख…

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभेमध्ये आपले म्हणणे मुद्देसूदपणे तसेच संसदिय पद्धतीने पण प्रभावी पणे मांडणाऱ्या आमदरांपैकी पराग अळवणी एक असल्याने त्यांना सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला असे उद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी काढले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल, लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले तर्फे आयोजित, पराग अळवणी यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.एक अभ्यासू आमदार निवडून दिल्याबद्दल त्यांनी पार्लेकरांचे आभार मानले. विधानसभा हे अत्यंत प्रभावी व्यासपीठ असून तेथे प्रश्न धसास लावता येतात याची अनेक उदाहरणे देत, मतदारसंघाच्या तसेच मुंबईच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला असे प्रतिपादन आमदार पराग अळवणी यांनी केले.एखादा प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्याचा असल्यास तो…

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- डॉ. रतीश तागडे यांनी “VIBGYOR” – ही एक निओ शास्त्रीय संगीत फ्यूजन कॉन्सर्टची संकल्पना मांडली आहे. यात ७ चक्रे, ७ म्युझिकल नोट्स, ७ संगीतकार, ७ संगीत शैली आणि ७ रंग यांच्यातील परस्पर संबंध रसिकांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. या मैफिलीत व्हायोलिनवर डॉ. रतीश तागडे, मृदंगमवर श्रीधर पार्थसारथी, कीबोर्डवर अतुल राणिंगा, तबल्यावर ओजस अधिया, बासरीवर निनाद मुळोकर, गायकीवर गंधार देशपांडे, गायनावर शिवानी वासवानी आणि ड्रम्स वर वर प्रियाश पाठक आहेत. दुस्थानी शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत, गझल, सूफी,…

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारताचा वैद्यकीय पर्यटनाचा दृष्टीकोन केवळ शारीरिक उपचारांपुरता मर्यादित नाही, तर त्यात मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचाही समावेश आहे. आयुष प्रणालीमुळे भारताला जगभरातील वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात एक विशेष स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, लवकरच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आयुषच्या १७० हून अधिक आजारांवरील उपचाराच्या पॅकेजेसचा समावेश करण्यात येणार आहे. मंडळ, तहसील स्तरावर आयुष औषध केंद्रे उघडण्यात येणार आहे. यामुळे आयुर्वेदासह आयुषच्या सर्व यंत्रणांची सर्व औषधे एकाच ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध होतील. सर्वप्रथम आयुष जन…

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार आहे. या निर्णयामुळे जामनेर तालुक्यातील 31 गावे, जळगाव तालुक्यातील 28 गावे आणि पाचोरा तालुक्यातील 16 गावे अशा एकूण 75 गावांना लाभ मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांच्या दूरदृष्टी आणि आणि विकासाभिमुख निर्णयामुळे या परिसरातील लोकांच्या जीवनमानात कमालीचा बदल होईल आणि हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे भागपूर…

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. याबैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सुरेश धस,आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार मेघना बोर्डिकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील, विश्वास पाटील, सदानंद मोरे आणि मराठा समाजाच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा…

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाकडे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शंभर विद्यार्थ्यांचे तसेच ४३० रुग्ण खाटांचे हे रुग्णालय स्थापन करण्यास २०२१ मध्ये मान्यता देण्यात आली होती. आता या महाविद्यालयाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक असे करण्यात येईल. तर महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक ही संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणात राहील. या रुग्णालयासाठी ६३२ कोटी ९७ लाख खर्चास मान्यता देण्यात आली.

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाने या संदर्भात झोपडपट्टीचा सर्व्हे तातडीने पूर्ण करून पात्र आणि अपात्र झोपडपट्टी धारकांची संख्या निश्चित करावयाची आहे. त्याप्रमाणे त्यांच्यासाठी किती जमीन लागेल, तेही निश्चित करायचे आहे. क्रेडीट लींक सबसिडी अंतर्गत राज्याशासनावर कोणतेही आर्थिक दायित्व येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. या दायित्वाची जबाबदारी विशेष हेतू कंपनीची राहील. हे धोरण अन्य कोणत्याही प्रकल्पास लागू होणार नाही.

Read More

दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद होत आहे. मीरा-भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी शासन विविध विकास प्रकल्प प्रकल्प राबवित आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, भाईंदर पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण, घोडबंदर किल्ला जतन व संवर्धन, निरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत लोकार्पण, भाईंदर नवघर येथील तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, काशी गाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, शासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते…

Read More