दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २९) वाळकेश्वर मुंबई येथील श्रीपाल नगर जैन मंदिर येथून झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी जैन मुनींचे दर्शन घेतले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, विश्वस्त रमण शहा, हिऱ्यांचे व्यापारी भरत शहा, हितेंद्र मोटा आदी उपस्थित होते.
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सह संचालक स्वप्निल कापडणीस,सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९९१ गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक असून, वाईट प्रवृत्तींचा नाश करते. त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने ‘हर घर दुर्गा’ अभियान सुरू करत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे. या अभियानामार्फत राज्यातील…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकर जागेत साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे. या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार संजय शिरसाट, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या उद्यानात सर्व तरुण…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटींच्या विभागीय कार्यालयासह विविध इमारती बांधण्यात येणार आहेत. या विभागीय कार्यालयासह अभ्यासिका, 500 मुलांची व 500 मुलींची वसतिगृह इमारत तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनींसाठीचे वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भूमिपूजन झाले. भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे,…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि दिशादर्शक असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंत्री श्री. भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज दुपारी संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरूवात झाली. खासदार धैर्यशील माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘जय श्रीराम जय…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. खानदेशच्या विकासाची तळमळ असणारा सुपुत्र महाराष्ट्राने गमावला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘ज्येष्ठ नेते पाटील यांनी दाजीसाहेब म्हणून आदराचे स्थान मिळवले होते. वडीलांकडून राजकारण, समाजकारणाचा वारसा मिळालेल्या, उच्चशिक्षित अशा ज्येष्ठ नेते पाटील यांची वाटचाल सरपंच ते राज्याचे मंत्री अशी चढत्या आलेखाची राहीली आहे. विधानसभेचे ते दीर्घकाळ सदस्य राहीले होते. या काळात त्यांनी महत्वाच्या विविध खात्यांची जबाबदारी…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालयातील परिषद सभागृहात माजी मुख्य सचिव तथा मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, खजिनदार विकास वि. देवधर, कार्यकारी सह सचिव जयराज चौधरी हे उपस्थित होते. अध्यक्ष स्वाधिन क्षत्रिय यांनी संस्थेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात केलेल्या ठळक कामांची माहिती दिली. यामध्ये ग्रंथालयातील पुस्तकांची संगणकीय यादी अद्ययावत करण्यात आली आहे. संस्थेचे नवीन सदस्य नोंदणी सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी सार्वजनिक प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एस एस गडकरी पुरस्कार नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. वातावरणीय बदलांच्या संकटाला तोंड देवून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनस्तरावर धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करून जिवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स’ देखील गठीत करण्यात आला आहे. राज्यात पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. यासाठी जागतिक…
