दिनांक :-२७-०८-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,मुंबई:- काठमांडू येथे पूरपरिस्थितीतही श्री.पशुपतिनाथ दर्शन सुलभ; नेपाळमधील कुशवाहा व माळी समाजाकडून विशेष आदरातिथ्य. नेपाळमधील पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ठीक ०८:०० वाजता काठमांडू येथील श्री.पशुपतिनाथ मंदिरात अत्यंत शांत, सुटसुटीत आणि शिस्तबद्ध वातावरणात सहकुटुंब भाविकांचे दर्शन संपन्न झाले. कोणतीही घाईगडबड न होता आई-वडिलांसह भगवान श्री.पशुपतिनाथांचे अत्यंत उत्तम रीतीने दर्शन घडले. नेपाळमधील या कठीण प्रसंगात माळी व कुशवाहा समाजाचे माजी मंत्री माननीय श्री.शत्रुघ्न सिंहजी, कुशवाहा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रमुख प्रदेश पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पूरपरिस्थिती असूनही सर्व भाविक पूर्णपणे सुरक्षित असून चिंतेचे कोणतेही कारण नाही. या वेळी कुशवाहा व माळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भाविकांचा विशेष सत्कार समारंभ…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक :- २४-०८-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज, मुंबई:-महाराष्ट्रातील वाढत्या पर्यावरणीय व वायू प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनावर न्यायालयाच्या स्तरावरून संबंधित हाय पॉवर कमिटीला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील वाढते वातावरणीय व पर्यावरणीय प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच पर्यावरण संवर्धनाच्या प्रश्नांवर मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून (Suo Motu) दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेअंतर्गत उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला सहकार्य करण्यासाठी ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार…
दिनांक :- २१-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,ठाणे:- ठाणे शहरात बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी जुगाराचे एक अत्यंत मोठे आणि धोकादायक रॅकेट सक्रिय झाले आहे. या ऑनलाईन लॉटरी जुगारामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.”गर्जा महाराष्ट्र न्यूज”चॅनेल’च्या गोपनीय टीमने ठाणे शहरात केलेल्या विशेष पाहणी व सर्वेदरम्यान परिमंडळ १ आणि परिमंडळ ५ च्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट उघडपणे चालवले जात असल्याचे समोर आले आहे. तपासातील प्रमुख मुद्दे व धक्कादायक बाबी: ठाणे शहरात मोठे रॅकेट सक्रिय: “गर्जा महाराष्ट्र न्यूज” ने विशेष लक्ष केंद्रित करून प्रथम ठाणे शहराचा आढावा घेतला असता, शहरात ऑनलाईन लॉटरी जुगाराचे अजस्र जाळ पसरल्याचे आणि एक मोठे रॅकेट उघडपणे कार्यरत असल्याचे निष्पन्न…
दिनांक :- १९-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,ठाणे:- ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील सर्वच्या सर्व पाचही उपायुक्त परिक्षेत्रात (१,२,३,४,५) परिमंडळ मध्ये बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. शहरातील कानाकोपऱ्यात उघडपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे दररोज कामगार,मजूर आणि गोरगरीब वर्ग भरडला जात असून अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त होत आहेत. रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि परिमंडळ निहाय जाळे ठाणे शहरात ऑनलाईन लॉटरीचे हे अवैध जाळे चालवण्यासाठी तीन मुख्य ऑपरेटर सक्रिय असल्याचे समोर येत आहे:- झोन १, झोन २ आणि झोन ५: या तिन्ही विभागांमध्ये ‘मोहम्मद’ नावाच्या व्यक्तीचे मोठे नेटवर्क कार्यरत असून त्याच्या माध्यमातून लॉटरीची अनेक बेकायदेशीर दुकाने थाटली गेली आहेत. झोन ३ आणि झोन…
दिनांक :- १७-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- सार्वजनिक उद्यानांचे रक्षण: नगरपालिका आणि महानगरपालिकांनी उभारलेल्या सार्वजनिक बागांमध्ये होणारे धुम्रपान, अस्वच्छता आणि झाडांची होणारी हानी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल. बेकायदेशीर वृक्षतोड व लाकूड वाहतुकीला आळा: पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात आणि लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई साठी पाठपुरावा केला जाईल. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ राज्यव्यापी मोहीम: केवळ झाडे लावणेच नव्हे, तर ती मोठी होईपर्यंत जगवण्याचा संकल्प घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवली जाईल. नागरिकांना सहभागाचे आवाहन: पर्यावरणाची हानी ही मानवी आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या परिसरात बेकायदेशीर प्रदूषण, धूर सोडणारे कारखाने किंवा…
दिनांक :- १७-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- महाराष्ट्रातील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामाला गती देण्यासाठी ‘ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशन’ने राज्यभरात आपले व्यापक जाळे तयार केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या संस्थेची तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अनुभवी टीम सज्ज झाली आहे. या राज्यस्तरीय नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि हाय पॉवर कमिटीला सर्वतोपरी तांत्रिक मदत केली जाणार आहे. संस्थेला राज्य पातळीवर पर्यावरण मंत्रालयाशी संलग्न ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी ‘ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल महाजन यांनी पर्यावरण मंत्री तसेच प्रधान सचिव जयश्री भोज यांच्याकडे पत्राद्वारे…
दिनांक :- १७-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातील भयानक जल-वायू प्रदूषण, अवैध जीन्स फॅक्टरी आणि बेकायदेशीर डायिंग कारखान्यांविरोधात ‘ग्रीन इंडिया पोल्युशन CONTROL फाउंडेशन’ने उठवलेल्या आवाजाची राज्याच्या पर्यावरण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन श्री अनिल महाजन यांच्या अर्जावर पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांनी एमपीसीबी (MPCB) सायन बोर्डाच्या सदस्य सचिवांना तात्काळ कठोर कारवाईचे व प्रशासकीय सुधारणांचे निर्देश दिले आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी आणि भिवंडीतील अवैध डायिंगचा प्रश्न भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या बेकायदेशीर डायिंग व जीन्स फॅक्टरींचे अतिविषारी रासायनिक पाणी प्रक्रिया न करता…
दिनांक :-१३/०८/२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,अंबरनाथ :- अंबरनाथ येथील गुरुशेकरन मुदलियार (वय ६८) यांची MH 05 CR 7730 क्रमांकाची दुचाकी दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाबाहेरून चोरीला गेली.या घटनेची माहिती त्यांचे जावई निखिल लक्ष्मण बिजवे यांना मिळताच त्यांनी तात्काळ अंबरनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावेळी त्यांचे मित्र अब्दुल अन्सारी हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. तक्रार मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दुचाकीचा शोध सुरू केला. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या २० ते २५ मिनिटांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून काढण्यात यश आले. अंबरनाथ पोलिसांच्या या जलद, तत्पर आणि कौतुकास्पद कारवाईचे नागरिकांकडून अभिनंदन व कौतुक…
दिनांक :-१२/०८/२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,मंत्रालय मुंबई: राज्य कारभाराची मुख्य इमारत आणि अतिशय संवेदनशील परिसर मानल्या जाणाऱ्या ‘मंत्रालय’ क्षेत्रात आज दुपारी गृहविभागाची दैना उघड करणारा संतापजनक प्रकार घडला. सुरक्षेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी वापरण्यात येणारी पोलिसांची एक मोठी ‘टेम्पो ट्रॅव्हल’ गाडी भर दुपारी मंत्रालयासमोरच बंद पडली. पूर्णपणे ‘डेड’ झालेली ही गाडी सुरू करण्यासाठी तब्बल ८ ते १० पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतः रस्त्यावर उतरून ‘दे धक्का’ करावा लागला. घटनेचा थरार आणि प्रत्यक्षदर्शींचे आश्चर्य आज दुपारी नेहमीप्रमाणे मंत्रालयाच्या आवारात गर्दी आणि व्हीआयपी हालचाली सुरू असताना, पोलीस खात्याची सदर टेम्पो ट्रॅव्हल गाडी अचानक जागेवरच बंद पडली. गाडी सुरू करण्यासाठी ड्रायव्हरने प्रयत्न केले, परंतु गाडी अत्यंत खराब अवस्थेत…
दिनांक :-०६/०८/२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी शहरात अवैध डाईंगचे वाढते प्रदूषण कल्याण,कोनगाव,भिवंडी,उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर, टिटवाळा येथे असलेल्या अवैद्य जीन्स फॅक्टरी मधून मोठ्या प्रमाणात अस्तित्वात कल्याण प्रदूषण विभाग सुस्त. अवैध जीन्स व डाईंग कारखान्यांवर कडक कारवाई करा; ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशनची पर्यावरण मंत्री, पंकजाताई मुंडे यांच्याकडे मागणी. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, कोनगाव, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा परिसरातील गल्लोगल्ली सुरू असलेल्या अवैध जीन्स आणि डाईंग कारखान्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ०४/०८/२०२६ रोजी ‘ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशन’ या राष्ट्रीय अशासकीय संस्थेचे चेअरमन श्री. अनिलभाऊ महाजन यांनी मंत्रालयात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची…
