Author: Team GarjaMaharashtra

दिनांक :- १३/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, उल्हासनगर, प्रतिनिधी :- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत संतोष नगर परिसरातील काही बांधकामे बाधित होणार असल्याच्या नोटिसांनंतर स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १२ जुलै २०२६ रोजी विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप गरड यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नागरिकांनी आपल्या शंका, चिंता व मागण्या मांडल्या. बैठकीदरम्यान शिवसेनेचे नगरसेवक श्री.अरुण आशान यांनी नागरिकांना आश्वासन देताना सांगितले की, “संतोष नगर परिसरातील कोणत्याही नागरिकावर अन्याय किंवा कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ दिला जाणार नाही. नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या बैठकीस शिवसेना शहर प्रमुख…

Read More

दिनांक :- ११/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, पन्हाळा (जि. कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील सातार्डे गावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनांबरोबरच चोरट्यांनी गावातून पळून जाताना एका नागरिकावर चाकूने हल्ला केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि रात्रीच्या गस्तीवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सातार्डे गावातील बंद असलेल्या घरांना लक्ष्य केले. चोरट्यांनी दोन घरांची कुलपे तोडून सुमारे ४१ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला, तर तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न केला. कुलूप लावलेली घरे अचूकपणे निवडण्यात आल्याने चोरट्यांनी यापूर्वी गावाची रेकी…

Read More

दिनांक – २४/०६/२०२६ मुंबई,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान काल रात्री 10 वाजताच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर तो वाद टोकाला गेला आणि धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मयंक लोहार या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मात्र त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी अजूनही फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Read More

दिनांक :- २३/०६/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, विशेष प्रतिनिधी (मुंबई/ठाणे/नवी मुंबई):- एम.एम.आर.डी. (MMRD) क्षेत्रात येणाऱ्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर,टिटवाळा,भिवंडी, पालघर, रायगड आणि पनवेल परिसरातील अनेक काही लॉजिंग-बोर्डिंगमध्ये सर्रासपणे बेकायदेशीर व अनैतिक प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’ वाहिनीच्या टीमने या संपूर्ण प्रकारावर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी आपल्या हद्दीतील लॉजिंग-बोर्डिंगची आजच कसून तपासणी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. शाळा-कॉलेजच्या परिसरात ‘अल्पवयीन’ मुला-मुलींना प्रवेश कसा ? अंधेरी, चेंबूर, गोरेगाव, मानखुर्द, ठाणे, मिरा-भाईंदर, टिटवाळा, पनवेल…

Read More

दिनांक :- २३/०६/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- मुंबईचे प्रवेशद्वार आणि लॉजिस्टिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात सध्या अनधिकृत बांगलादेशी महिला आणि मुलींच्या वास्तव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर कापड उद्योग (लूम) व कामगार वर्ग असल्याने या गर्दीचा फायदा घेत बांगलादेशी महिलांना बेकायदेशीरपणे आश्रय दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे केवळ साधे वास्तव्य नसून यामागे एक मोठे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत पुरवठा मिळालेल्या माहितीनुसार, दलाल (एजंट) प्रथम या बांगलादेशी महिलांना व मुलींना भिवंडीत आणतात. त्यानंतर काही स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचे बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर…

Read More

दिनांक :- २२/०६/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी प्रभाग समिती क्रमांक ०२ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये सध्या अवैध बांधकामांनी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून उच्छाद मांडला आहे. गणेश सोसायटी, रावजी नगर, सुभाष नगर, बिट चौकी ते थेट अप्सरा टॉकीज पर्यंतच्या परिसरात सर्रासपणे आणि मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर इमारतींचे बांधकाम सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पावसाळा तोंडावर आलेला असतानाही पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने, “भिवंडी महानगरपालिका आयुक्त कुंभकरणाच्या झोपेत आहेत का?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे. पावसाळ्यात वाढली अपघातांची भीती भिवंडी शहराचा अवैध आणि धोकादायक बांधकामांचा इतिहास अत्यंत क्लेशदायक राहिला आहे. यापूर्वी शहरात अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळून…

Read More

दिनांक :- २२/०६/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शहरातील अनेक भागांत रात्रभर नियमबाह्य पद्धतीने सुरू राहणारी हॉटेल्स याला कारणीभूत ठरत आहेत. या हॉटेल्सबाहेर रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि टवाळखोरांचा वावर वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या त्रासाकडे भिवंडीचे नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. पवन बनसोडे कधी लक्ष देणार आणि यावर कधी कडक कारवाई करणार? असा संतप्त सवाल आता भिवंडीकर उपस्थित करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील ‘हॉटेल आनंद’, वेलकम हॉटेल. वंजारपट्टी नाक्यावरील ‘बाबा हॉटेल’, आणि खंडू पाडा परिसर…

Read More

दिनांक – १३/०४/२०२६ मुंबई ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- छत्रपती शिवाजी महाराजl टर्मिनस (CSMT) आणि ऐतिहासिक बाजार गेट स्ट्रीट रोड परिसरात सध्या अनधिकृत हॉकर्स, दुकानदार आणि बेशिस्त वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे अत्यंत कठीण झाले आहे. संपूर्ण फूटपाथ हॉकर्स आणि स्थानिक दुकानदारांनी गिळंकृत केले असून, या गंभीर समस्येकडे मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या वाढत्या त्रासामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. फूटपाथवर चहाच्या टपऱ्या आणि टवाळखोरांचा सुळसुळाट बाजार गेट परिसरातील ठिकठिकाणी बेकायदेशीर चहाचे स्टॉल्स आणि पान टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. या टपऱ्यांच्या बाहेर दिवसभर शेकडो लोक धूम्रपान करत आणि चहा पीत गर्दी करून उभे…

Read More

दिनांक :- १७/०६/२०२६, गर्जा महाराष्ट्र न्यूज पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा शहर हे जळगाव जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ असलेले आणि वेगाने वाढणारे शहर आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्यासोबतच शहरात वाढणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या माऱ्या, मोबाईल चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या, ए.टी.म (ATM)फोडणे घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आता तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘जलद प्रतिसाद पथक’ (Quick Response Squad) काळाची गरज! शहरातील गुन्हेगारांचा थरकाप उडवण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक *विशेष जलद प्रतिसाद पथक (QRS)* स्थापन करण्यात यावे. या पथकात केवळ तरुण, तत्पर आणि धावपळ करू शकणाऱ्या कार्यक्षम पोलीस…

Read More

दिनांक – ०२/०६/२०२६ मुंबई , गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ओबीसी जनक्रांती परिषदेची नवीन राज्य कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई येथे जून २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ओबीसी जनक्रांती परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अनुषंगाने संघटनेची नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील १८ पगड जाती व १२ बलुतेदार ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ओबीसी जनक्रांती परिषदेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ओबीसी नेते तथा ओबीसी जनक्रांती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आगामी काळात संघटन बांधणी, ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवरील आंदोलने, मोर्चे तसेच समाजहिताचे विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र…

Read More