Author: Team GarjaMaharashtra

दिनांक :- १७/०६/२०२६, गर्जा महाराष्ट्र न्यूज पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा शहर हे जळगाव जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ असलेले आणि वेगाने वाढणारे शहर आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्यासोबतच शहरात वाढणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या माऱ्या, मोबाईल चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या, ए.टी.म (ATM)फोडणे घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आता तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘जलद प्रतिसाद पथक’ (Quick Response Squad) काळाची गरज! शहरातील गुन्हेगारांचा थरकाप उडवण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक *विशेष जलद प्रतिसाद पथक (QRS)* स्थापन करण्यात यावे. या पथकात केवळ तरुण, तत्पर आणि धावपळ करू शकणाऱ्या कार्यक्षम पोलीस…

Read More

दिनांक – ०२/०६/२०२६ मुंबई , गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ओबीसी जनक्रांती परिषदेची नवीन राज्य कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई येथे जून २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ओबीसी जनक्रांती परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अनुषंगाने संघटनेची नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील १८ पगड जाती व १२ बलुतेदार ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ओबीसी जनक्रांती परिषदेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ओबीसी नेते तथा ओबीसी जनक्रांती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आगामी काळात संघटन बांधणी, ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवरील आंदोलने, मोर्चे तसेच समाजहिताचे विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र…

Read More

दिनांक – २६/०५/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार मानले जाते. भिवंडी शहर हे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक व व्यापार उद्योगाचे केंद्र म्हणूनओळखले जाते. परंतु भिवंडी शहरांमध्ये महापालिकेचा अतिशय गलथान व भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नको त्या लोकांचा राजकीय हस्तक्षेप व भ्रष्टाचाराने भरभटलेले अशिक्षित काही अधिकारी व कर्मचारी वर्ग त्यांच्यामुळे भिवंडी महानगरपालिका ओळख ही “ड” वर्गाच्या महापालिकेत गणना केली जाते. प्रभाग क्रमांक ०१,०२,०४ या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम सुरू आहे. नियमाचे बिनधास्तपणे उल्लंघन केले जात आहे. कायदा धाब्यावर बसून हे लोक काम करत आहेत. तसेच प्रभाग क्रमांक .०३ व ०५ या ठिकाणी ही…

Read More

दिनांक – २५/०५/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहरात लूम कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सदरचा कामगार हा मोठ्या प्रमाणात ताडी पिणारा आहे. भिवंडी शहरात सध्या ताडीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे.शहरात जे अधिकृत ताडीचे दुकान आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी डुप्लिकेट ताडीचा सर्रास वापर होत आहे. त्यामध्ये नशेची पावडर व नशेच्या गोळ्या टाकून मोठ्या प्रमाणात ताडी विक्री होत आहे. त्यामुळे अनेक कामगारचे आयुष्य उध्वस्त होत आहे. भिवंडी शहरातील ताडी दुकानांमध्ये उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पातळीच्या टीमने छापा टाकून ताडीच्या भरलेल्या ड्रम मधून ताडी तपासणीसाठी तात्काळ लॅबमध्ये पाठवावी. मंत्रालयाचे वरिष्ठ पत्रकार तथा गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक श्री.अनिलभाऊ…

Read More

दिनांक – २०/०५/२०२६ जळगाव, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भडगाव,पाचोरा,जामनेर या तिन्ही तालुक्यांमध्ये बेकायदेशीर पणे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. शेकडो ट्रक भरून बेकायदेशीर रित्या लाकूड वखारी मध्ये जात आहे.बेकायदेशीर लाकूड घेणाऱ्या वखारीवर ताबडतोब कारवाई करावी. तसेच बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रीन इंडिया पॉल्युशन कंट्रोल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तसेच गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे मुख्य संपादक श्री.अनिलभाऊ महाजन मुंबई यांनी वनमंत्री श्री.गणेश नाईक यांच्याकडे मागणी केली आहे.अशा मागणीचा ई-मेल यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे. पाचोरा,भडगाव,जामनेर या ठिकाणी असलेल्या वखार ज्या ठिकाणी अवैध लाकूड कटिंग केली जाते या…

Read More

दिनांक – १६/०५/२०२६ भिवंडी /ठाणे,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी ग्रामीण तालुका पोलीस स्टेशन,पडगा पोलीस स्टेशन, गणेशपुरी पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत मुंबई-नाशिक हायवे वरती अनेक ढाबे हॉटेल्स आहेत.रात्रीचा या रस्त्याला एक मोठा जलसा दिसतो.यापैकी 75 टक्के ढाब्यांवरती हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.भिवंडी शहरातील सर्व लहान-मोठे अनेक लोक तरुण मुले,नाबालिक मुले या ठिकाणी हुक्का पिण्यासाठी जात आहे.यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ टोबॅको,डबल एप्पल,दुबई स्पेशल,एप्पल मिंट,मलई सालसा अशा विविध प्रकारचे नशेडी फ्लेवर या मध्ये वापरले जात आहे.ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री.मित्तल साहेब यांच्या सूचनेचे सुद्धा या ठिकाणी पालन होताना दिसत नाहीये. भिवंडी तालुका,पडगा,गणेशपुरी या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रंदिवस अनेक…

Read More

दिनांक – २७/०४/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहरात रोज रात्री ०१ ते ०५ दरम्यान येणाऱ्या कोयला भरून येणाऱ्या ओवरलोड ट्रक सप्लाय जोरात सुरू. कोयला भरून येणाऱ्या ट्रककडे भिवंडी ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष…. दररोज रात्री लाखो रुपयाचा कोयला ओव्हरलोड ट्रक मधून होतोय सप्लाय…. भिवंडी ट्राफिक पोलिसांचा विषय पुन्हा चर्चेला, अनेक नियमबाह्य काम भिवंडी ट्राफिक विभागात सुरू. (01) भिवंडी शहरात दररोज रात्री व आठवड्याला शेकडो ओव्हरलोड ट्रक कोयला भिवंडी शहरात येत आहेत. यावर ट्राफिक पोलीस कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत. (02) स्टोन क्रशर कंपनी येथून भुसा भरून अनेक ओवरलोड शेकडो ट्रक भिवंडी शहरात येत आहेत. (03) भिवंडी शहरात खाच्या रिक्षा मोठ्या…

Read More

दिनांक – २८/०४/२०२६ पाचोरा / जळगाव ,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- पाचोरा शहरातील अनेक तरुण व्यसनाधीन आणि कर्जबाजारी.कुटुंबावर आर्थिक संकटाचे सावट. पाचोरा तालुक्यात अवैध सावकारी बोकाळली आहे. अवैध सावकारी करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेची मागणी. पाचोरा तालुक्यातील काही मास्तर, शिक्षक ,प्राध्यापक,डॉक्टर, सरकारी नोकरदार, अधिकारी, राजकारणी, अवैधरित्या धंदा करणारे लोक या सर्व क्षेत्रातील अनेक लोकांचे पैसे काही ठराविक लोकांच्या माध्यमातून अवैधरित्या मार्केट मध्ये अवैध सावकारीच्या रूपाने फिरत आहे. याला सर्व सामान्य तरुण वर्ग बळी पडत आहेत याला लगाम लागला पाहिजे. सध्या पाचोरा शहरात अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. कर्ज बाजरी होत आहे. 10% 20% 30% दराने व्याजाने…

Read More

दिनांक – २७/०४/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वरिष्ठ पत्रकार ,मुख्य संपादक गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल श्री.अनिल महाजन, मुंबई यांनी भिवंडी ट्राफिक पोलिसांन बाबत तसेच अनधिकृत ट्राफिक वार्डन नेमणुकी बाबत गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे व लवकरच या विषयावर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांची मुलाखती घेणार आहे. भिवंडीत वाहनधारकांना दंड न ठोकता आर्थिक देवाण-घेवाण करून गाड्या सोडण्यात येत आहे. भिवंडी शहरात ट्राफिक पोलिसांचा खाजगी पंटरावर जोर. वार्डन बंदी असताना वार्डन का ? ठेवण्यात येत आहे. भिवंडी ट्राफिक पोलिसांनी बेकायदेशीर खाजगी वार्डन नियुक्त केलेले आहे. अशी सूत्रांची माहिती आहे भिवंडी शहर ट्राफिक पोलीस वाहनधारकांना पकडतात त्यांचे वाहन…

Read More

दिनांक – २७/०४/२०२६ मुंबई ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दक्षिण मुंबईतील पायधोनी येथे एका धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक अहवालानुसार, टरबूज खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, घाटी गल्लीतील त्यांच्या घरी टरबूज खाल्ल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी गंभीर लक्षणे जाणवू लागली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी काही तासांतच त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयेशा (१६) व झैनब (१३) अशी पटली आहे. हे कुटुंब दाट लोकवस्तीच्या भागातील मुघल बिल्डिंगमध्ये राहत होते. स्थानिक वृत्तसंस्था एफ३ न्यूजच्या वृत्तानुसार,…

Read More