दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १८३ पैकी २१ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी चाळीतील काही वर्षे प्रलंबित असलेले एक प्रकरणदेखील निकालात निघाले आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश ए. एस. पंडागळे आणि ए. जे. फटाले, वकील अस्वीनी सिंग आणि पी. पी. तवसाळकर यांनी यशस्वी केले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक अतुल…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विनय क्षीरसागर यांची ०१ डिसेंबर २०२४ पासून आय आर क्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक – (मॅनेजिंग डायरेक्टर) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी उद्योग आणि चाचणी, तपासणी आणि प्रमाणता सेवा उद्योगांमध्ये त्यांना पस्तीस वर्षांपेक्षा जास्त समृद्ध अनुभव आहे, त्याद्वारे श्री विनय क्षीरसागर व्यवसायात वाढ, नाविन्य आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेमध्ये निपुणता आणणे साध्य करतील. ते आयएसएसपीएलला चाचणी, तपासणी, शाश्वतता आणि डिजिटल सोल्यूशन्स यासह अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय वाढवण्याच्या दिशेने मार्गदर्शन करतील. आयआरक्लास…
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ग्राम शिक्षण सेवा मंडळ धोलवड या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भालचंद्रशेठ सोपानबुवा नलावडे यांना वै. ह. भ. प. कोंडाजीबाबा डेरे वारकरी पुरस्कार हा श्री क्षेत्र विठ्ठलवाडी, पिंपळगांव सिद्धनाथ, (ता. जुन्नर) येथे ह. भ. प. गुरुवर्य जेष्ठ किर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकदादा घोलप, जनसेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. कृष्णा खंडागळे, तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, नवी मुंबई फळ बाजार येथील अनेक फळव्यापारी हजर होते. धोलवड गावातील अनेक ग्रामस्थ, पिंपळगांव सिद्धनाथ, विठ्ठलवाडी ग्रामस्थ, परीसरातील बंधू भगिनी बहुसंख्येने ऊपस्थित होते. आळंदी येथील सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्थ…
दिनांक –१४/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने नवी मुंबईत वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. १४ ते २५ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2024” चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून व्यवसायवृध्दी व्हावी असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.+ महालक्ष्मी सरसचे नवी मुंबईतील हे दुसरे वर्ष असून, मागील वर्षी सरसला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्याप्रमाणे या वर्षी सुध्दा ‘महालक्ष्मी सरस’ वाशी येथील सिडको…
दिनांक –१४/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केलेले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बिकेसी, वांद्रे येथे दि. 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, या परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार मंगल प्रभात…
धर्मेंद्र आणि त्याच्यासह दोन जणांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने समन्स बजावले आहे. गरम धरम ढाब्याच्या फ्रँचायझी प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत दिल्लीतील एका व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे. ‘गरम धरम ढाब्यात गुंतवणूक करण्यासाठी दिशाभूल’ एएनआयच्या वृत्तानुसार, व्यावसायिक सुशील कुमार यांच्या तक्रारीनंतर न्यायदंडाधिकारी यशदीप चहल यांनी हे समन्स पाठवले आहे. गरम धरम ढाब्यात गुंतवणूक करण्यासाठी आपली दिशाभूल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पहिल्या तपासात तक्रारदाराने दिलेले पुरावे 5 डिसेंबर रोजी न्यायमूर्तींनी डॉ. आरोपीने स्वत:च्या फायद्यासाठी फिर्यादीला प्रवृत्त करून फसवणूक केल्याचे दिसून येते. धर्मेंद्र आणि इतर दोघांना फसवणूकीच्या कलम 420, कट रचण्याच्या कलम 120B आणि आयपीसीच्या कलम…
दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे गर्व्हर्नर म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी दिली. ते विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, 11 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील.
दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांचा गळा दाबून खुन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मांजरी फुरसुंगी रस्त्यावरुन अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितले की, सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांना शिंदवणे घाटात आणल्याचे दिसून येते. तेथे त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचे दिसून आले. शिंदवणे घाटात सायंकाळी गेलेल्या लोकांना हा मृतदेह दिसला. त्यांनी उरुळी कांचन पोलिसांना याची माहिती…
दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने सोमवारी हाहाकार उडाला. बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 10.45 च्या सुमारास मोठा अपघात झाला. बेस्टची ३३२ क्रमांकाची बस एका सोसायटीची भिंत तोडून नियंत्रणाबाहेर जाऊन थांबली, अनेक वाहने आणि सुमारे ३० जणांना चिरडले. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 26 जण जखमी झाले. मृतांमध्ये ३ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. नियंत्रणाबाहेर गेलेल्या…
दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शिवसेनेच्या दबावानंतर मुंबईत भरघोस वीजबिल देणारे अदानी कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर लवकरच बदलण्यात येणार आहेत. या मीटरमुळे ग्राहकांना वाढीव बिलांचा सामना करावा लागत होता. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत शिवसेनेने काल कुलाबा येथील इलेक्ट्रिक हाऊसवर निदर्शने करत प्रशासनाला घेराव घातला. या वेळी बेस्ट प्रशासनाने नवीन मीटर बसवण्याचे काम थांबवून आधीच बसवलेले मीटर बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे या स्मार्ट मीटरना गुजरात आणि नागपूरमध्येही विरोध झाला होता, त्यामुळे ते तिथेच थांबवण्यात आले होते. केंद्र सरकारच्या नवीन धोरणांतर्गत बेस्टने मुंबईत स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली होती, मात्र या मीटर्समुळे वीज बिलात…
