दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरवले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. 25 जानेवारीपासून पुन्हा अंतरवालीला आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Breaking
- उल्हासनगरमध्ये मुदत संपण्यास अवघा एक महिना शिल्लक असलेल्या लहान मुलांच्या औषधांचे आशा सेविकांमार्फत वितरण; नागरिकांकडून चौकशीची मागणी
- प्रधानमंत्री आवास योजनेबाबत संतोष नगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता; विठाई प्रतिष्ठानच्या बैठकीत नगरसेवकांचे आश्वासन
- सातार्डेत एकाच रात्री तीन घरफोड्या; पोलीस गस्त कुठे? चोरट्यांचा धुमाकूळ, ग्रामस्थांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
- लोकलमध्ये रक्तरंजित थरार… दरवाजा बंद करायला सांगताच संताप, प्रवाशालाच भोसकलं;
- गर्जा महाराष्ट्र न्यूजचा दणका: एम.एम.आर.डी. परिसरातील लॉजिंग-बोर्डिंगमधील गैरप्रकारांवर ‘वॉच’; पोलिसांना तातडीने तपासणीचे आवाहन.
- भिवंडीत बांगलादेशातून महिला आणणारे मोठे रॅकेट सक्रिय; पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
- भिवंडी महानगरपालिका आयुक्त कुंभकरणाच्या झोपेत? प्रभाग समिती २ मध्ये अवैध बांधकामांचा सुळसुळाट!
- भिवंडीत रात्रभर सुरू राहणाऱ्या हॉटेल्समुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ? नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोडे कधी लक्ष देणार? नागरिकांचा सवाल.

