दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मौजे काळुस (ता. खेड जि. पुणे) येथील भूसंपादन रद्द करण्याबाबत आणि पुनर्वसनाचे शिक्के उठवण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. असे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस खासदार अजित गोपछेडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह जलसंपदा, मदत व पुनर्वसन आणि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रकल्प, कालव्यांच्या कामासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, मात्र त्या आता लाभ क्षेत्रात येत नाहीत अशा जमिनी संबंधित शेतकऱ्यास परत देण्याबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास करून याबाबत धोरण ठरविण्यात येईल. यासाठी संबधित विभागांनी सविस्तर अहवाल तयार करावा. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीस ठेवून याबाबत धोरण ठरविण्यात येईल.
शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. त्यामुळे मौजे काळुस (ता. खेड जि. पुणे) येथील भूसंपादन रद्द करण्याबाबत आणि पुनर्वसनाचे शिक्के उठवण्याबाबत सुरू असलेले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मंत्री श्री.पाटील यांच्या आवाहनाला बैठकीस उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देऊन उपोषण मागे घेत असल्याचे जाहिर केले.
Breaking
- ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनच्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; प्रदूषण हाय पॉवर कमिटीला आवश्यक कारवाईचे निर्देश.
- ठाण्यात अवैध ऑनलाईन लॉटरी जुगाराचा सुळसुळाट:- गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या टीमचा आज ठाण्यात सर्व्हे. सर्व्हे मधून खळबळजनक खुलासा .
- ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या ०१ ते ०५ परिमंडळामध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर गोरगरिबांचे संसार उध्वस्त.
- प्रदूषणमुक्त आणि हरित महाराष्ट्रासाठी “ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशन”चे रणशिंग; बेकायदेशीर कारखाने, वृक्षतोड व प्रदूषणाविरोधात तीव्र लढा!
- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल’ सज्ज; MPCB आणि पर्यावरण मंत्रालयाला मिळणार राज्यभर तांत्रिक मदत.
- अवैध जीन्स फॅक्टरींना आशीर्वाद देणाऱ्या MPCB अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि कल्याण कार्यालयात तातडीने कर्मचाऱ्यांची भरती करा.
- अंबरनाथ पोलिसांची तातडीची कारवाई; २० ते २५ मिनिटांत चोरीची दुचाकी हस्तगत!
- मंत्रालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या गाडीला ‘दे धक्का’; गृहविभागाच्या कारभाराचे उघडे पडले धिंडवडे!

