दिनांक – २९/०८/२०२४,मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टीका केली आहे. राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय असे ते म्हणाले आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या राज्यातील महिला, मुली, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नाहीत असे दिसते. अशा बातम्या वाचून आपल्या राज्यात “कणा नसलेले सरकार”…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – २९/०८/२०२४,मुंबई प्रतिनिधी ,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त मांगल्य उजावणी साजरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.सर्व शाळांमध्ये पाचवी ते दहावी या वर्गाकरिता श्री भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित १५ ते २० सप्टेंबर २०२४ या कालावधीकरिता निंबध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. मंत्रालयात श्री भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्माण वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीला व्यवस्थापन समितीचे सदस्य ललीत गांधी, पवन संघवी, संदीप भंडारी, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे शिक्षण निरीक्षक भक्ती…
दिनांक – २९/०८/२०२४,मुंबई प्रतिनिधी ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ‘म्हाडा’ च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला दि. १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. नवीन व मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला गृहसाठा म्हणून सदनिका प्राप्त असून अत्यल्प उत्पन्न गटातील…
रायगड : चुलत भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. रविंद्र सोनू जगताप असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना तळा तालुक्यातील मजगाव बौद्धवाडी येथे १६ फेब्रुवारी २०१९ ला घडली होती. आरोपी रविंद्र सोनू जगताप आणि त्याचे काका हिरामण जगताप यांच्यात नारळाची झाडे तोडल्यावरून वाद झाला होता. या वादानंतर हिरामण जगताप यांच्या पत्नीने आरोपी रविंद्र जगताप यास शिविगाळी केली होती. याच रागातून आरोपी रविंद्र याने मुंबईहून गावात आलेल्या हिरामण जगताप यांचा मुलगा दिपक याचा चाकू आणि कोयत्याने पोटावर आणि खांद्यावर वार करत हत्या केली. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात आरोपी…
VINESH PHOGAT । करोडों भारतीयांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तिने अंतिम फेरी गाठली होती, पण आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. याचा स्पष्ट अर्थ विनेश फोगट आज ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भाग घेऊ शकणार नाही. संपूर्ण देशाला विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती आणि ती आज रात्री उशिरा तिचा सुवर्णपदकासाठीचा सामना खेळणार होती, पण आता तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र का ठरवण्यात आले ते जाणून घेऊया… विनेश फोगट हिला ५० किलो वजनी गटात अपात्र ठरवण्यात आले आहे. तिचे वजन १००…
जालना प्रतिनिधी : आरक्षण हा साधा सोपा विषय नाही. तिथे लोकांच्या वेदना आणि आक्रोश आहे. मात्र, महाराष्ट्रात बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. कारण महाराष्ट्र हा आमचा आहे. केवळ नेत्यांचा नाही. हा सगळ्या जातीधर्मांच्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे. इथे शांतता आहे. काही लोक राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मराठा समाज त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. सरकारने बांगलादेशमधील परिस्थितीवरून सरकारने धडा घ्यावा, असं विधान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलं आहे. तसेच महाराष्ट्र हा सर्व जातीधर्मांच्या लोकांचा असून बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्या राज्यात कधीही निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले. ज्यांना गरिबीच्या झळा बसल्या आहेत, ज्यांचा मुलाला एका टक्क्याने…
BSNL 5G : सरकारी कंपनी बीएसएनएल आपल्या किमतींमध्ये फार बदल न करता खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना सध्या दिसत आहे. नुकताच बीएसएनएल 5G वरुन पहिला कॉल यशस्वीपणे करण्यात आला असून त्यामुळे बीएसएनएल 5G लाँचिंगच्या तयारीला वेग आल्याचे स्पष्ट आहे. जिओ, एअरटेल, व्हीआय या कंपन्यांनी नुकतीच दरवाढ केली असून याचा फायदा बीएसएनएल झाल्याचे दिसून आले आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या दरात वाढ केल्यानंतर बीएसएनएलने आपल्या दरात कोणतीच वाढ केली नाही त्यामुळे याचा फायदा बीएसएनएलला झाल्याचे दिसून आले. अनेकांनी आपला नंबर बीएसएसएलवर पोर्ट केल्याचे दिसून आले. बीएसएनएलकडून 5G लाँचच्या तयारीला वेग आला आहे. त्यामुळे लवकरच बीएसएनएल ही 5G मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेल यांच्याशी स्पर्धा करेल…
BIGGBOSSMARATHI : बिग बॉस मराठीचा ५वा सिझन सुरु आहे. हा सिझन सुरु होऊन एक आठवडाच झाला आहे. असं असताना या कार्यक्रमात रडारड, भांडणं, टोमणे, आरोपप्रत्यारोप असं सगळं घडताना दिसत आहे. यावरूनच प्रेक्षकांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. कोणत्या स्पर्धकाला आपला सपोर्ट असणार? याबाबत सोशल मीडियावर पोस्ट पाहायला मिळत आहेत. अभिनेते आणि बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमधील स्पर्धक किरण माने यांनीही यावर आपलं मत मांडलं आहे. धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन: श्याम दराडे या तिघांना किरण माने यांनी पाठिंबा दिला आहे. तशी पोस्ट किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. किरण माने म्हणंतात, ‘‘हे कसेही खेळले, समजा मुर्खपणा केला, तरी…
Rohit Sharma Record : भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून २४० धावा केल्या. ज्यामुळे भारताला विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या सामन्यात शुबमन गिलने कर्णधार रोहित शर्मासह भारताच्या डावाची सलामी दिली. या सामन्यात रोहित शर्माने २ धावा करताच राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडीत काढला. रोहित शर्मा आता वनडे फॉर्मेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, जिथे राहुल द्रविड आधी होता. राहुल द्रविडने त्याच्या वनडे कारकिर्दीत १०,७६८ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने या…
आरोग्य : उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’, असे म्हटले जाते. कारण- उच्च रक्तदाब हा आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, सकाळचा तुमचा रक्तदाब कसा आहे यावरून तुम्ही तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्याविषयी जाणून घेऊ शकता. “सकाळच्या रक्तदाबामुळे आपल्याला काही गंभीर संकेत मिळतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका” असे तज्ज्ञ म्हणतात. तसेच, तज्ज्ञ सांगतात, “दिवसभर आपल्याला रक्तदाबात चढ-उतार दिसून येतो. विशेषत: सकाळी रक्तदाब वाढतो. सकाळी उच्च रक्तदाब दिसून येणे, हे चिंतेचे कारण असू शकते. “रक्तदाब हा ताण हार्मोन, झोपेचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे वाढू शकतो. रक्तदाब कधीतरी वाढणे हे सामान्य असले तरी सतत उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत असेल, तर…
