Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल व यंत्रनिगराणी कार्यशाळा व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या संस्थेमधील निर्लेखित झालेले निरुपयोगी व भंगार साहित्याची दरपत्रके मागवून विक्री करावयाची आहे. त्याकरिता इच्छुक जी.एस.टीधारक भंगार खरेदीदारांनी विहित नमुन्यातील नमुना अर्ज ङिडी.सह दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सिलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक संस्था, पनवेल एन.के.चौधरी यांनी केले आहे. सदरील भंगार साहित्य संबंधित विभागामध्ये ठेवण्यात आलेले असून सदरचे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने विक्री करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निरनिराळ्या व्यवसायामधील जुन्या व निकामी झालेल्या यंत्रसामुग्री तसेच भंगार व निरुपयोगी साहित्याचे एम.एस.…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीचे अभ्यास मंडळ सदस्य प्रा. सुनील शिंदे यांना स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य व कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून लेखक, समीक्षक, संपादक, व्याख्याते, समाजशास्त्र व इतिहास विषयाचे तज्ञ शिक्षक, अशी त्यांची ओळख आहे. उपक्रमशील प्राध्यापक ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यासमिती सदस्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळ चेअरमन, विषयतज्ञ मार्गदर्शक, पेपर…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमीपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश म्हस्के, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी आमदार व कोळी महासंघाचे…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाची (CPA India Region) 10 वी परिषद दिनांक 23 व 24 सप्टेंबर, 2024 रोजी नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सचिव-1 (कार्यभार) जितेंद्र भोळे तसेच सचिव-2 (कार्यभार) डॉ. विलास आठवले हे उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय परिषदेमध्ये “शाश्वत आणि समावेशी विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर विचारमंथन होणार आहे. चर्चासत्रात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधिमंडळ विधानपरिषद…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. 22) बाल कर्करुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या. राज्यपालांच्या सूचनेनुसार लहान मुलांना राजभवनाची सैर करविण्‍यात आली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते. यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय.के. सप्रू, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रू बिसेन व कार्यकारी संचालक निता मोरे आदि उपस्थित होते.

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार असून सोमवार, 23 सप्टेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. कोनशिला अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती ए.एस.ओक, न्यायमुर्ती दीपंकर दत्ता, न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय उपस्थित राहणार आहेत. सध्या मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे 16 ऑगस्ट 1862 रोजी स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. नोव्हेंबर…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला प्रार्थना समाज मुंबई येथुन हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, भक्तियोग आचार्य यशोविजय महाराज, अचल गच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वर महाराज तसेच जैन संघांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. तीर्थंकर भगवान महावीर यांनी समाजाला अहिंसा, सत्य आणि करुणा ही तत्त्वे दिली आहेत. ही रथयात्रा भगवान महावीरांच्या शिकवणीची आठवण करून देणारी आहे असे सांगून महावीरांची तत्वज्ञान आज विशेष प्रासंगिक आहे असे राज्यपालांनी सांगितले रथयात्रेत सहभागी झालेल्या जैन संघाचे अभिनंदन करुन ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन नागरिकांसाठी 21 व 22 सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचा वर्षपुर्ती सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या आकर्षक कलाकृतींची…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सकल मातंग समाजाच्या अनेक मागण्या आहेत. यापैकी बऱ्याचशा मागण्या शासनाने पूर्णत्वास नेल्या आहेत. समाजाच्या उर्वरित मागण्या पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. सकल मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. सकल मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयातील समिती कक्षामध्ये आयोजित बैठकीत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सकल मातंग समाजाच्यावतीने मच्छिंद्र सकटे, श्री. वाडेकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सोना बागुल आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते.…

Read More