दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून राज्याची आरोग्यसेवा अधिक बळकट होणार आहे. यामुळे राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या 6000 होणार आहे. विकासाचा प्रत्येक प्रकल्प हा सामान्य जनतेसाठी असून, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाने आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे व्यापार वाढणार आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा समावेश आहे.…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्याचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करून मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे महत्वपूर्ण कार्य रंगकर्मी, कलाकार करीत असतात. अनेक दिग्गज कलाकारांच्या कलाआयुष्याला त्यांच्या बालपणीच सुरूवात झालली असते. बाल नाटकांचे महत्व लक्षात घेता राज्यातील बाल नाटकांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने 62 वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा नाट्य गौरव सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, दादर येथे झाला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, अवर सचिव बाळासाहेब सावंत उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गिर्यारोहण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीकरिता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२४’ चे वितरण महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दसऱ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच खंडेनवमीला, शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४ या दिवशी सायंकाळी ४.०० वा. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे होणार आहे. पुरस्कार खालील प्रमाणे – 1. ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार’ – पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल, उत्तराखंड 2. शिखर सावरकर दुर्गसंवर्धन पुरस्कार – सिस्केप, रायगड 3. शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार – इंद्रनील खुरंगळे या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित,…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सोमवारी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. रतन टाटा यांच्याबद्दल देशातील जनतेला वेगळीच आपुलकी होती. टाटा कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांनी लाखो कुटुंबाना आपलंसं केलं होतं. देशभक्ती…
दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते विधान मंडळ सदस्य डॉ भारती लवेकर, अभिनेते सुनील पॉल, क्रिकेट पंच अनिल चौधरी, डॉ बसंत गोयल, लेखक मुस्तफा गोम आदींना भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, बुद्धांजली रिसर्च फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलाश मासूम आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.
दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, प्रशासकीय इमारत (डेअरी विभाग), पहिला मजला, अब्दुल गफारखान मार्ग, वरळी सी फेस, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, सदस्य गोरक्ष लोखंडे, वैदेही वाढाण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव, पोलीस महासंचालक आदी उपस्थित असणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव संजय कमलाकर यांनी कळविले आहे.
दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच इर्षाळवाडी येथे भेट दिली होती. त्यावेळी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री रायगड तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांना निर्देश दिले होते. या सुचनेनुसार जिल्हा उद्योग केंद्र रायगडद्वारे इरसाळवाडी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कार्यशाळा घेण्यात आली. तसेच महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. इर्षाळवाडी येथे आयोजित या कार्यशाळेकरिता ग्रामपंचायत चौक व इरसाळवाडी येथील सुमारे 70 महिला उपस्थित होत्या. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक जी.एस.हरळया व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. उपस्थित काही महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज येथे केले असून उर्वरित…
दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या वचन पूर्ती जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे बुधवार, दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी मोर्बा,ता.माणगाव येथे स. 11 वा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे, यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे…
दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. त्यामुळे याभागात भीती आणि दहशतीवर मात केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डावी कडवी विचारसरणी प्रभावीत क्षेत्राच्या सुरक्षा व विकासाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात 2014 ते 2024 या दहा…
दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसुचनेनुसार राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी नवीन पूर्ण बांधणी झालेल्या (Fully Built) परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी करण्यासाठी 4.0 संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. आता अशा पूर्णत: नवीन बांधणी झालेल्या टुरीस्ट टॅक्सी, सर्व तीन चाकी मालवाहू वाहने व 7,500 किलोग्रॅम पेक्षा कमी सकल भार क्षमता असलेली चारचाकी या परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी अधिकृत वाहन वितरकांमार्फत होणार आहे. या निर्णयाचे ऑटोमोबाईल असोसिएशनच्यावतीने स्वागत करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही व्यक्त करण्यात आले आहे. या वाहनांची नोंदणी आता विक्रेत्यांकडेच होणार असल्यामुळे वाहन धारकांना परिवहन कार्यालयाकडे वाहनांना आणायची गरज…