दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावाचे ३३ वर्षिय फौजी जवान शेतात वडीलांना मदतीसाठी गेले असतांना शेतातुन परतीचा प्रवास करतांना विजांचा कडकडाट होवुन विज पडल्याने जागेवरच जवानाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली. शहरातील नवीन कॉलेज मागील परिसरातील रहिवासी असलेले तालुक्यातील अंतुर्ली खडकी येथील सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे (वय-३३) हे नवीन घराची वास्तुशांती करण्यासाठी रजा घेऊन घरी आले होते. दि. ९ रोजी दिवसभर परीवारासह पेडकाई माता या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन आपल्या गावी आले असते अचानक सायंकाळी पावसाची रीमझीम सुरू झाली तेव्हा हातातील मनगटी घड्याळ आणि मोबाईल विजे पासुन सुरक्षेच्या दृष्टीने घरी ठेवून आपल्या बाईकवर वडीलांना मदतीसाठी शेतात धाव घेतली असता विजेचा कडकडाट होत वडीलांच्या अवघ्या १०० फुटांवर स्व. भुषण बोरसे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली आहे. स्व. भुषण बोरसे हे बिहार येथील मोतीहारी ७ टि १बीएन बटालीय मध्ये सशस्त्र सिमा बल मध्ये कार्यरत होते. त्यांना एक मुलगा,पत्नी,आई,वडील असा परीवार आहे. पाचोरा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन बोरसे परीवाराचे सात्वंन केले. स्व.भुषण बोरसे यांनी नवीन वास्तू बांधली म्हणून तिचे वास्तुशांती कार्यक्रमासाठी रजेवर घरी आले होते. यासाठी काही दिवसांपासून पत्रिका वाटत होते. अशातच या घटनेमुळे सर्वांनाच हळहळ व्यक्त होत आहे. तहसीलदार यांनी तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
● नेमकी विज पडली कशी?
स्व.भुषण बोरसे जेव्हा वडीलांना शेतात मदतीला गेले तेव्हा त्यांनी विज अंगावर पडु नये म्हणून काळजी म्हणून हातातील मनगटी घड्याळ आणि मोबाईल घरीच काढुन ठेवल्यावर विज पडली कशी तर ते बाईक वर वडीलांच्या बैलगाडी मागे येत असतांना इलेक्ट्रिक तारा आणि शेतातील डीपी याच्या कडे विज आकर्षकीत झाली आणी सरळ स्व. भुषण बोरसे यांच्या उजव्या खांद्यावर स्पर्श करून गेली असल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात स्थानिकांनी दिली आहे. यातुन भविष्यात शेतकऱ्यांनी काळजी घेतांना इलेक्ट्रिक डीपी आणि विज तारा पासून सावध राहीले पाहीजे असे अवाहन करण्यात आले आहे.
Breaking
- मंत्रालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या गाडीला ‘दे धक्का’; गृहविभागाच्या कारभाराचे उघडे पडले धिंडवडे!
- पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशनचे चेअरमन श्री.अनिल भाऊ महाजन यांनी दिनांक ०४/०८/२०२६ रोजी घेतली भेट .
- पाचोऱ्यात ५ कोटींचा पूल बनून तयार, पण रस्ताच गायब! ३ महिन्यांत रस्ता सुरू न झाल्यास वरिष्ठ पत्रकार,सामाजिक नेते श्री.अनिल महाजनांचा आंदोलनाचा इशारा.
- ठाणे जिल्ह्यात भिवंडी,कल्याण,उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या औद्योगिक पट्ट्यात प्रदूषणाचा विळखा. ३०० हून अधिक अनधिकृत कारखान्यांवर कारवाईसाठी ‘ग्रीन इंडिया’ आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा.
- भिवंडीतील ग्रामीण चाविंद्रा भागात ढाब्यांच्या आडून अवैध हुक्का पार्लर्सचा धिंगाणा; ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’ करणार लाईव्ह पोलखोल, काही सडक छाप लोकल कार्यकर्त्यांन कडून पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव टाकण्याचा काही लोकांचा पर्यंत.
- भिवंडीत अवैध बांधकामांचा सुळसुळाट; ०५ हि प्रभागातील बीट निरीक्षकांचे भूमाफियांशी साटेलोटे?
- भिवंडीतील अवैध ‘धनलक्ष्मी डाईंग’ विरोधात ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’ची धडक; मुख्य संपादक अनिल महाजन यांच्या पुढाकाराने पर्यावरण मंत्री व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा कडे तक्रार दाखल.
- भिवंडीतील नदी-नाल्यांमध्ये विषारी केमिकलची अवैध विल्हेवाट; स्थानिक नागरिकाचे आरोग्य धोक्यात टँकरधारकांवर कठोर कारवाईची मागणी.

