दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू बीच, मुंबई येथे राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले. दलामल हाऊस, नरीमन पाँईंट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस निमित्ताने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री. दराडे म्हणाले, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत सर्व १३ किनारी राज्यांमध्ये २१ सप्टेंबर, २०२४ रोजी (आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस) समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आलेली…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणारी एसटी 9 वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर धावू लागली आहे. आर्थिक संकटामध्ये रूतलेल्या एसटीने आता भरारी घेतली असून महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल 9 वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात आल्याने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत भविष्यातही प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने नफ्यात येईल, असे प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे. मागील काळात दोन वर्ष…
दिनांक –१४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण ‘ हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ’ प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते दि. २० सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक यावेळी…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणान्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे या उद्देशाने यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी -शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत www.mahamesh.org या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत. यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई- सुविधेसह २० मेंढ्या तसेच मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- रायगड जिल्हयामधील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु, आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतक-यांसाठी आधार प्रमाणिकरण करुन घेणे करीता महा-आयटी यांनी दिनांक १८ सप्टेबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत संबंधीत शेतकरी लाभार्थ्याने आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत जिल्हयातील सर्व बँकांनी प्रोत्साहनपर लाभासाठी ३०३६५ इतक्या कर्जदार लाभार्थ्याची खाती अपलोड केली आहेत. त्यापैकी १७९८२ इतक्या लाभार्थी शेतक-यांना विशिष्ट क्रंमाक प्राप्त झाले आहेत. आणि त्यापैकी १७६८१ इतक्या लाभार्थी शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले असून अद्याप १८१ शेतकरी लाभार्थी…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली ‘फुलवंती’ दिमाखत बसलेली दिसत आहे. या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपाने कोणीही घायाळ होईल. आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेल्या फुलवंती सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे. ‘पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची…. रंभा जणू मी देखणी”…असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’च्या रूपामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 11 ऑक्टोबरला फुलवंती सिनेमा बॉक्सऑफिसवर…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत भारताचे संविधान राहील आणि संविधानाने दिलेले आरक्षण राहील.आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो. खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येईल. अशी घोषणा…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारत भेटीवर आलेल्या फिनलँड संसदेच्या वाणिज्य विषयक समितीच्या सदस्यांनी गुरुवारी (दि. १२) समितीचे अध्यक्ष सकारी पिस्टो यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांचे कुलगुरू देखील उपस्थित होते. फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत एरिक एफ हॉलस्ट्रॉम हे देखील उपस्थित होते. भारत व फिनलँड आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचे ७५ वर्षे साजरे करीत आहेत. बैठकीत महाराष्ट्र व फिनलँड मधील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य, विशेषतः विद्यार्थी -, शिक्षक -आदान प्रदान, संशोधन, सामायिक सत्र, कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता,…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी – सकल उत्पन्न दुप्पट होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीच्या दिशेने टाकलेल्या पावलांना बळ दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर) ला ‘जागतिक आर्थिक केंद्र’ म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.…
दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच ४७ बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यातील अर्ज १३ सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्यात येत असून १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त अर्जांचे शुल्क स्वीकारण्याचे कामकाज सुरू करण्यात येईल. आकर्षक अथवा पसंती क्रमांक घेण्यास इच्छूक असलेल्या अर्जदारास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर क्रमांक देण्यात येणार आहे. मालिका सुरू होण्याच्या दिनांकास सकाळी ११ वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास आकर्षक क्रमांकासाठी…