दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षणाचा लाभ देण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीस मुदतवाढ देण्याची मागणी समाजाकडून करण्यात आली होती. त्यानुसार समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच सकल धनगर समाजाच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयातील समिती कक्षामध्ये आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शिंदे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव व विधी परामर्ष सुवर्णा…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन २० सप्टेंबर, २०२४ रोजी बुरहानी महाविद्यालय माझगाव, मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. या कार्यक्रमास आमदार श्रीमती यामिनी जाधव, तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव हे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील व्यवसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा, या अनुषंगाने राज्यामधील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. या आचार्य चाणक्य कौशल्य विकास १००० केंद्रांचा उद्घाटन समारंभ २०…
दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टिकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १५०० मतदारांची संख्या आता सरासरी १२०० पर्यंत असेल, त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली असून परिणामी मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे. निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक…
दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज मंत्रालयात श्री. सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, माजी सदस्य एस. एस. संधू, महारेराचे मावळते अध्यक्ष अजोय मेहता तसेच गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दिनांक –२०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश संघटक-सचिव,ओबीसी-बहुजन नेते अनिल महाजन यांनी आज प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली विनंती.तसेच पक्षाचे मुख्य सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे लेखी पत्र दिले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटक-सचिव,ओबीसी-बहुजन नेते अनिल महाजन यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश कार्यालय येथे जयंत पाटील यांची भेट घेतली व यावेळी यांना जळगाव जिल्ह्याच्या पक्ष संघटनात्मक बाबत व आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला रोखायची असेल तर ते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) हे योग्य रीतीने जिल्ह्यात महायुतीला आळा घालू शकतात.जिल्ह्यातील पक्षाचे इतर नेते फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरता…
दिनांक –२०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने भारतातील पहिले मार्केटप्लेस स्कॅनमायट्रिप डॉटकॉम लाँच केले आहे. ओएनडीसी नेटवर्कवर प्रवास सेवांची विक्री करण्यासोबत खरेदी करणारी इझमायट्रिप पहिली ओटीए देखील ठरली आहे. नवीन उत्पादन स्कॅनमायट्रिप डॉटकॉम ओटीए, एमएसएमई, ट्रॅव्हल एजंट्स आणि होमस्टेना त्यांच्या ऑफरिंग – फ्लाइट्स, हॉटेल्स व होमस्टे ओएनडीसी नेटवर्कवर सूचीबद्ध करत सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले मार्केटप्लेस आहे. तसेच त्यांना व्यापक डिजिटल मार्केटप्लेस देखील उपलब्ध होईल. इझमायट्रिपचा ओएनडीसी नेटवर्कसोबतचा सहयोग प्रवास व पर्यटन क्षेत्रातील व्यवसायांना ओएनडीसी प्रदान करणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधांचा फायदा घेण्याची सुविधा देईल, तसेच लहानात लहान सेवा प्रदात्यांना व्यापक ग्राहकवर्गाशी…
दिनांक –२०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी शासनाने निर्गमित केलेला निधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वितरित करण्यात यावा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या. विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत व त्यांना आर्थिक मदत करण्याबाबत आयोजित बैठकीत कृषी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. संत्रा व मोसंबी उत्पादक बागायतदार शेतकरी यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठवला आहे. यासंदर्भात लवकरात लवकर मदत वितरित करण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत व पुनर्वसन विभागास केल्या, त्याचबरोबर मॅग्नेट प्रकल्पांतर्गत संत्रा पिकासाठी करण्यात येत…
दिनांक –२०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शहरात उभारण्यात आलेले संत, महापुरुष यांची स्मारके आपल्या सर्वांना नेहमीत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील. ही स्मारके ऊर्जा देण्यासोबतच भावी पिढीला समतेचा आणि मानवतेचा संदेश देतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बुलढाणा नगर परिषदेमार्फत बुलढाणा शहरातील विविध भागात संत आणि महापुरुषांचे पुतळे स्थापीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील शिवरत्न शिवा काशिद, संत गाडगे बाबा तर जयस्तंभ चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर…
दिनांक –२०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारासाठी कृषी विभागातील विविध महामंडळाच्या समन्वयाने दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कृषी विभागांतर्गत विविध महामंडळाच्या समन्वयाने तालुक्यात मेळावे आयोजित करण्याबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी संचालक विजयकुमार आवटे व विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना विविध माध्यमातून राज्य शासन दरवर्षी किमान 50 हजार रुपये देत आहे तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी आणि…
दिनांक –२०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय “कलगीतुरा” या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता स्टेन ऑडिटोरियम येथे सादर होणार आहे. “कलगीतुरा” हे नाटक मराठी लोककलेचा अप्रतिम नमुना असून, नाटककार दया पाटील यांनी या नाटकाचे लेखन दहा वर्षांच्या संशोधनातून साकारले आहे. या संगीत नाटकाचे दिग्दर्शन सध्याचे आघाडीचे नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांनी केले आहे. तब्बल २२ कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकात हेमंत महाजन, विमल ननावरे, निलेश सूर्यवंशी, अर्णव इंगळे, आणि ऋषिकेश शेलार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकार भूमिका साकारत आहेत.…