दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशात साजरा केला जाणारा प्रत्येक सण समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो. ओणम हा प्राचीन सण साजरा करताना केरळीय समाजामार्फत सांस्कृतिक वारसा जपला जातो, ही उत्साहवर्धक बाब असून सर्वांनी आजही समर्पक असणाऱ्या एकता, करुणा आणि सेवा या मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. बॉम्बे केरळीय समाजाच्या वतीने आज मुंबईत ओणम उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘विशाल केरलम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बॉम्बे केरळीय समाजाचे अध्यक्ष डॉ. एस. राजशेखरन, मानद सचिव विनोदकुमार नायर,…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतातील आघाडीची ड्रोन तंत्रज्ञान कंपनी आयोटेकवर्ल्ड एविगेशन आणि एक प्रमुख सहकारी संस्था इफको यांच्या भागीदारीमुळे डिसेंबर २०२३ पासूनच्या केवळ ८ महिन्यांत ११ भारतीय राज्यांतील ५०० पेक्षा जास्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. या भागीदारीतून ५०० ड्रोन शेतीच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी समर्पित केले गेले आहेत. या उपक्रमाचा उद्देश शेती पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणणे आणि भारतातील शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याचा आहे. नुकतीच आयोटेकवर्ल्ड आणि इफको यांनी ‘एग्रीबोट’ ड्रोन ग्राहकांसाठी एक विशेष मर्यादित कालावधीसाठी ऑफर जाहीर केली आहे, ज्यात शेतकरी आणि सेवा प्रदात्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. या अनन्य…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नवे सांस्कृतिक धोरण हे सर्वंकष व व्यापक असून महाराष्ट्राला देशात अव्वल बनवेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्याच्या सांस्कृतिक धोरण-2024 ला कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या नवीन सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार लवकरच ही समिती जाहीर करतील. सांस्कृतिक धोरणाच्या शिफारशी केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे श्री मुनगटीवार यांनी सांगितले. राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010 चे पुनर्विलोकन करण्यासाठी 2022 मध्ये मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचे…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्रम-२०३० संदर्भात केंद्र शासनाच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्राची बांधिलकी आणि योगदान महत्वाचे आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठीचा एकात्मिक दृष्टीकोन स्विकारण्यात आला आहे. शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती बरोबरच भारताला समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्वाचे ठरत आहे, असे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाच्या (CPA India Region) १० व्या परिषदेत ते बोलत होते. नवी दिल्ली येथे दिनांक २३ व २४ सप्टेंबर, २०२४ रोजी लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद “शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दुर्गम अति दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील ६३ हजार तर महाराष्ट्रातील ४ हजार ९७५ आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यामधील ३२ जिल्ह्यातील १२ लाख ८७ हजार ७०२ आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- निर्माता सलीम अख्तर यांच्या दृष्टीकोनातून आणि दिग्दर्शक जुली जैस्मिन यांच्या कौशल्याखाली सिनेमाचा `डाल रोटी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सर्किटमध्ये एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून उदयास आला आहे. हा चित्रपट ग्रामीण जीवनाचे अस्सल चित्रण दिसून येते. त्याच्या सशक्त कथाकथनामुळे आणि सांस्कृतिक प्रासंगिकतेसाठी प्रेक्षकांवर तो खोलवर परिणाम साधत आहे. प्रतिभावान दिग्दर्शिका ज्युली जस्मिन यांनी `दाल रोटी’ने त्याच्या मार्मिक कथनासाठी, विशेषतः भारतातील शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षांच्या चित्रणासाठी दाद मिळवली आहे. या चित्रपटाने अलीकडेच प्रतिष्ठित 16 व्या जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (JIFF) विशेष ज्युरी पुरस्कार मिळवला, जो ज्युली जस्मिनच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचा उत्तम नमुना आहे. JIFF मधील यशाव्यतिरिक्त, दाल रोटीची आगामी…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- द बॉडी शॉप या मूळच्या ब्रिटिश आंतरराष्ट्रीय एथिकल ब्यूटी ब्रॅण्डने आपली लोकप्रिय व्हिटॅमिन सी स्किनकेअर श्रेणी सर्वांपुढे आणण्यासाठी भारतीय मॉडेल व अभिनेत्री डायना पेंटी हिच्याशी सहयोग केला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून एका सुलभ पण प्रभावी दिनक्रमावर प्रकाश टाकला जाणार आहे. या दिनक्रमामुळे त्वचेवर नैसर्गिक, तेजस्वी चमक येते. सणासुदीच्या काळात त्वचेला झळाळी आणण्यासाठी हा दिनक्रम उत्तम आहे. व्हिटॅमिन सी स्किनकेअर श्रेणीमध्ये डेली ग्लो क्लींजिंग पॉलिश, ग्लो रीव्हिलिंग सीरम, ग्लो बूस्टिंग इंटेन्स मॉश्चुरायजर आदी उप्तादनांचा समावेश आहे.द बॉडी शॉपने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये डायना तिच्या त्वचेची काळजी घेण्याच्या व्यक्तिगत दिनक्रमाबद्दल (स्किनकेअर रुटीन) सांगते. तिच्या रुटीनमध्ये द…
दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदेने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून अनिल महाजन यांचा एरंडोल पारोळा मतदार संघात दौरा. विकासापासून दुर्लक्षित झालेला मतदारसंघ एरंडोल-पारोळा या मतदारसंघात नव्याने विकास कामे करण्यासाठी आगामी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून इच्छुक उमेदवार अनिलभाऊ महाजन यांचा परिचय दौरा सुरू होत आहे. प्रत्येक गावात जाऊन सर्व नागरिकांशी ओळख परिचय करणार आहेत. तसेच यावेळी दोन्ही तालुक्यांमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी वाटचाली बाबत ते आपले भूमिका जाहीर करणार आहेत. नवतरुण युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी काम करणार आहेत. या परिचय संवाद दौऱ्यादरम्यान सर्वांच्या भेटी घेणे काही नवीन लोकांशी ओळख परिचय करणे. एरंडोल-पारोळा…
दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. वेळ ही अमूल्य बाब असून आयुष्यात त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पदक देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरचे संचालक भिमराया मेत्री, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी…