दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इस्लाम धर्माबाबत व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह संदेश पाठवल्याने महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये खळबळ उडाली आहे. एका व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली असून या आरोपात 16 जणांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. रविवारी सायंकाळी मोंढा येथे झालेल्या दगडफेकीत वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे हेही जखमी झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, ’50 लोकांच्या जमावाने दुकानावर दगडफेक केली आणि व्यापारी कैलाश काबरा यांच्या घराची तोडफोडही केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कैलाश काबरा याने व्हॉट्सॲपवर इस्लामविषयी आक्षेपार्ह संदेश पाठवले होते. केंद्रे आणि त्यांच्या टीमने दगडफेक थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दुखापत झाली. घटनास्थळी…
Author: Team GarjaMaharashtra
बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-सी एन जी पंपावर गॅस भरत असताना त्याच्या गॅसचे नोझल उडून ते कामगाराच्या डाव्या डोळ्यावर जोरात लागले. हा फटका इतका जबरदस्त होता की, त्यामुळे कामगाराला आपला डावा डोळा कायमचा गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत हर्षद गणेश गेहलोत (वय २३, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मालक व मॅनेजर धैर्यशील पानसरे व राहीत हरकुर्की यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सी एन जी पेट्रोल पंपावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील तीन हत्ती…
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) आपले दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले आहेत. 20 डिसेंबरपर्यंत, लोक बंदरात विनामूल्य फेरफटका मारू शकतात आणि त्याच्या 150 वर्षांच्या जुन्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकतात. या दौऱ्यात बंदर अधिकारी बंदराचे कामकाज आणि जहाजांच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेची माहिती देतात. देशातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे (बीपीटी) दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहेत. दोन दिवसांत 1500 हून अधिक लोकांनी बंदर गाठले आणि 150 वर्षे जुन्या बंदराचे महत्त्व जाणून घेतले. दक्षिण मुंबईतील बीपीटीची स्थापना १८७३ मध्ये झाली. गेल्या अनेक दशकांपासून या बंदराचा वापर सागरी व्यापारासाठी होत आहे. सध्या या बंदराचा वापर केवळ व्यावसायिक…
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आम्ही मागील अडीच वर्षे टीम म्हणून काम केले आहे. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रति आम्ही उत्तरदायी आहोत. ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहोत. शेतकऱ्यांच्या, जनतेच्या हिताचे प्रकल्प सुरू करून त्यांना चालना दिली. एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना यांची सांगड घातली. लोकाभिमुख आणि गतिमान शासन आणून यापुढेही गतिमानतेने निर्णय घेऊ. या पुढील काळात सर्वसामान्य जनतेसाठी व राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यास महाराष्ट्र शासन हातभार लावणार आहे.
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन…
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा पार पडला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती. समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अँड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले,…
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने सीएनजी वेईकल श्रेणीमध्ये मोठे प्रयत्न करणे सुरू ठेवले आहे, जेथे मार्केट लीडर म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. प्रबळ उत्पादन पोर्टफोलिओ आणि धोरणात्मक उपक्रमांसह कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत एकूण सीएनजी श्रेणीमध्ये २१.१ टक्क्यांचा प्रभावी मार्केट शेअर संपादित केला. महाराष्ट्रात या कालावधीदरम्यान ब्रँडच्या एकूण कार विक्रीमध्ये ३४ टक्के सीएनजी वेईकल्स होत्या, ज्यामधून प्रबळ प्रादेशिक वाढ दिसून येते. टाटा मोटर्सची शाश्वत गतीशीलतेप्रती कटिबद्धता विकसित होत असलेल्या ऑटोमोटिव्ह लँडस्केपशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या सक्रिय दृष्टिकोनामधून दिसून येते. टिएगो, टिगोर, नेक्सॉन, अल्ट्रोज आणि पंच असे लोकप्रिय मॉडेल्स सीएनजी…
पार्ले महोत्सव २०२४ ची चाहूल; २१ डिसेंबरपासून शानदार आयोजन महोत्सवातील सहभागासाठी स्पर्धकांची नावनोंदणी सुरु दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- केवळ पार्लेकरच नव्हे तर संपूर्ण मुंबई परिसरातील सांस्कृतिक, क्रिडा, कला क्षेत्राचे आकर्षण असलेल्या बहुप्रतिक्षित पार्ले महोत्सव २०२४ आमदार पराग अळवणी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली विलेपार्ले येथे २१ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत होत आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष असून या महोत्सवाची रौप्यमहोत्सवी वाटचाल अधिक जोमाने सुरु आहे. या महोत्सवात विविध वयोगटात वैयक्तिक आणि सांघिक अशी सुमारे ३५०० पारितोषिके असून ६० हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा प्राथमिक अंदाज आहे. साठ्ये महाविद्यालय संकुल, दुभाषी मैदान तसेच विविध ठिकाणी त्याचे आयोजन…
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १८३ पैकी २१ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी चाळीतील काही वर्षे प्रलंबित असलेले एक प्रकरणदेखील निकालात निघाले आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश ए. एस. पंडागळे आणि ए. जे. फटाले, वकील अस्वीनी सिंग आणि पी. पी. तवसाळकर यांनी यशस्वी केले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक अतुल…
