दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ई-गव्हर्नन्सची २७ वी राष्ट्रीय परिषद ३ सप्टेंबर २०२४ रोजी जिओ कन्वहेक्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात “डेटा गव्हर्नन्स प्रायव्हसी अँड सिक्युरिटी इन डिजिटल एज” या विषयावर चर्चासत्र झाली. यामध्ये युआयडीएआयचे सीईओ अमित अगरवाल, ग्लोबलचे सीईओ परेश शाह, 3 आय इन्फोटेकचे ऋषी अगरवाल, नॅसकॉमचे अच्युत घोष, इझीगोव्हचे व्यवस्थापकीय संचालक अमित शुक्ला सहभागी झाले होते. दुसऱ्या सत्रात प्रशासनामधील कृत्रिम बद्धिमत्ता या विषयावर चर्चा झाली. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनात वापर या विषयावर माहिती देण्यात आली. यात आयआयटी गुडगावच्या अंजली कौशिक, आय.एम.एम. इंदोरचे प्रशांत सलवान (दूरदृष्य प्रणालीद्वारे), जियोचे डॉ.…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातील गुन्ह्यांबाबत ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदनाद्वारे केली. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांची विधान परिषदेचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबईतील राजभवन येथे भेट घेतली. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना महिलांवरील अत्याचार आणि उपाययोजना संदर्भात निवेदन सादर केले आहे. अल्पवयीन मुली आणि महिलांसोबत गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांना अनेकदा फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर गुन्हेगार दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे देत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींकडून आलेले…
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- लातूर जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पीक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने…
दिनांक – ०५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले सोल्युशन्स पुरवणारी आघाडीची कंपनी मॅक्सहबने नवी उत्पादने सादर करून आपल्या उत्पादन श्रेणीचा विस्तार केला आहे. कॉर्पोरेट आणि शैक्षणिक क्षेत्रात संवाद व समन्वयात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने ही नवी उत्पादने तयार करण्यात आली आहेत. या नवीन श्रेणीतील एक्स७ सीरिज इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल्स (आयएफपी) खासकरून कॉर्पोरेट वापरासाठी डिझाईन करण्यात आली आहेत. बिझनेस मीटिंग्स प्रभावी व्हाव्यात यासाठी आवश्यक अत्याधुनिक क्षमता यामध्ये आहेत. यु३ सीरिज देखील यावेळी सादर करण्यात आली, यातील इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल्स शिक्षण क्षेत्रासाठी तयार करण्यात आली आहेत, जी संवादात्मक व सर्वांना सामावून घेणाऱ्या शिक्षण अनुभवांना प्रोत्साहन देतात. या इंटरॅक्टिव्ह डिस्प्लेच्या बरोबरीने…
दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालूक्यातील एका पती-पत्नीने गळफास घेऊन एकत्रच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर असं या दाम्पत्याचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत दोन्ही मृतदेहाची शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटल येथे पाठवले आहेत. आठ दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या 21 वर्षीय मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तसेच दोन वर्षांपूर्वी वाडेकर दाम्पत्याच्या 16 वर्षीय मुलाने देखील राहत्या घरात आत्महत्या केली होती या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केलाय. या दोन्ही पती-पत्नीच्या जवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या…
दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्हा बँक वाचावी व शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळावी यासाठी संघर्ष करत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा शब्द सहकार मंत्री अतुल सावे व पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला होता. परंतु गेले दोन वर्ष शासनाने याकडे दुर्लक्ष केले. राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. परंतु यावर काहीही पावले शासनाने उचलली नाही. म्हणून राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…
दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात झालेल्या महसूल कायदा सुधारणा समितीच्या बैठकीवेळी महसूल मंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. बैठकीस समितीचे अध्यक्ष उमाकांत दांगट, सदस्य शेखर गायकवाड दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच महसूल विभागाचे सहसचिव सुनील कोठेकर, अजित देशमुख, धनंजय निकम यासह विविध मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, जमीन महसुलाच्या अनुषंगाने राज्यातील कायदे जुने झाले आहेत. त्यामध्ये काल सुसंगत बदल व सुधारणा होण्याची गरज आहे. हे…
दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या मौजे सावरगांव माळ येथे कृषी समृध्दी नवनगर (स्मार्ट सिटी) विकसित करतांना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. आज मंत्रालयात बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या नवनगर (स्मार्ट सिटी) कामाचा आढावा बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब. गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, व्यवस्थापक दत्तप्रसाद नडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री…
दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात आज शेगाव ते पंढरपूर महामार्गाच्या दुरूस्तीबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब. गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, व्यवस्थापक दत्तप्रसाद नडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री.भुसे म्हणाले, या पालखी मार्गाच्या दुरूस्तीचे काम ज्या कंपनीने अपूर्ण ठेवले आहे, त्या कंपनीच्या अनामत रकमेतून उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावीत. तसेच संबंधित कंपनीवर…
दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मौजे काळुस (ता. खेड जि. पुणे) येथील भूसंपादन रद्द करण्याबाबत आणि पुनर्वसनाचे शिक्के उठवण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. असे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस खासदार अजित गोपछेडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह जलसंपदा, मदत व पुनर्वसन आणि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रकल्प, कालव्यांच्या कामासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, मात्र त्या आता लाभ क्षेत्रात येत नाहीत अशा जमिनी संबंधित शेतकऱ्यास परत…