दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रात चार दशके राजकारण गाजवणाऱ्या बड्य नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा; व्हिडीओ आला समोर महाराष्ट्रातील राजकारणात चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वीश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच यावेळी भावनिक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले.
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी, विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बीव्हीए आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे सरचिटणीस तावडे यांच्यावर प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी मतांच्या बदल्यात रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला आहे. राजन नाईक वसई तालुका विधानसभा उमेदवार भाजपा यांचा हॉटेल विवांता विरार येते विनोद तावडे आणि राजेंद्र नाईक यांचे चिरंजीव पैसे वाटप करत असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलला घेराव घातला. या दरमान्य बीव्हीए आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांच्या कार्यकर्त्यांमधील गोंधळाचा व्हिडिओ वायरल झाला आहे
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सोमवारी कश्मिरा शाहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्यासोबत झालेल्या अपघाताची माहिती दिली. काहीतरी मोठे घडणार होते, पण ते लहानच ठरले, असे ती म्हणाली. मात्र, त्याचे काय झाले हे त्याच्या पोस्टवरून स्पष्ट झाले नाही. आता तिचे पती कृष्णा अभिषेक यांनी हेल्थ अपडेट दिले आहे. काश्मिराचा अपघात भारतात नाही तर अमेरिकेतील पाम स्प्रिंग्समध्ये झाला. स्क्रीनशी संवाद साधताना कृष्णा म्हणाला, “हा एक मोठा अपघात होता. ती मॉलमध्ये होती आणि अचानक आरशाला धडकली. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि आता सुरक्षित आहे.” कृष्णा पुढे म्हणाला, “तिची सुरक्षा माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची…
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मेघना साने यांना ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांनी सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व अध्यक्षा नमिता कीर उपस्थित होत्या. परदेशात स्थापन झालेल्या मराठी शाळा, त्यांच्या अभ्यासक्रमाची निर्मिती, तिथे शिकवले जाणारे विषय, मराठी शिक्षणाचे तेथे असलेले महत्त्व याचा अभ्यास करून मेघना साने यांनी ‘मराठी सातासमुद्रापार’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला अनुराधा नेरूरकर यांनी प्रस्तावना लिहीली आहे. सतीश…
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (शरद गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघात हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे. त्यांनी आपले डोके टॉवेलने बांधले आहे. या हल्ल्याचा निषेध करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात माजी गृहमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचं राज्य आहे, असा प्रश्न निर्माण होतो. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील हे काटोल…
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा अदानीकडे उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अदानींना मोठमोठे प्रकल्प देण्यात आल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. त्यात धारावीचाही समावेश आहे. राहुल गांधींनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान तिजोरी उघडली आणि त्यातून गौतम अदानी आणि पीएम मोदींचे “एक हैं तो सुरक्षित हैं” चे पोस्टर दाखवले. पोस्टर दाखवत ते म्हणाले की सुरक्षित कोण आहे हा प्रश्न आहे. धारावीचे भविष्य सुरक्षित नाही. एका व्यक्तीच्या फायद्यासाठी धारावीला उद्ध्वस्त…
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ (No voters to be left behind) या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत. मोफत बस सुविधेकरिता बेस्टकडून मतदान केंद्राच्या निश्चित ठिकाणानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आला…
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी तसेच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून ५ पोलिस उप अधिक्षक,१८ पोलिस निरीक्षक,१०४ सहायक निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, १६०४ पोलिस शिपाई यांच्यासह १४५० होमगार्ड,१०३ एनसीसीचे कॅडेट यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आहे. निवडणूका शांततेत आणि निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.जिल्ह्यात एकूण ४ विधासभा मतदारसंघ आहेत.निवडणूकांच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय पोलीस पथकातील ४ तुकड्या क्षेत्रात दाखल झाल्या आहेत.यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांनी सुरू केल्या आहेत. रात्रीच्या वेळेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून गस्ती घातली जात आहे.मागील काही दिवसांपासून पोलिसांनी बेकायदा शस्त्र पोलिसांकडून जप्त केले आहेत. तसेच संवेदनशील मतदारसंघात पोलिसांचा रुट मार्च काढला जात आहे. यामध्ये २४० उमरगा विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,३ पीआय,१७ एपीआय, ३३२ पोलिस शिपाई,३०५ होमगार्ड, १९ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,५ पोलीस वाहने,१४ अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच २० वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. २४१- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,४ पीआय,२३ एपीआय, ३७३ पोलिस शिपाई,३८४ होमगार्ड, ३७ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,५ पोलीस वाहने,२० अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच २६ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. २४२ – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात २ पोलिस उप अधिक्षक, ५ पोलीस निरीक्षक,३० सहाय्यक पोलीस निरीक्षक,४०१ पोलिस शिपाई,३८६ होमगार्ड,२३ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,११ पोलीस वाहने,२४ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,तसेच ३६ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. २४३ – परंडा विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,४ पोलीस निरीक्षक,३० सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३८८ पोलिस शिपाई,३६७ होमगार्ड,२४ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,६ पोलीस वाहने,२६ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,तसेच ३३ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.तर सीआरओ आणि इतर सुरक्षेमध्ये २ पीआय,४ पोलीस उपनिरीक्षक,११० पोलीस शिपाई,८ होमगार्ड,१४ वाहने २ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,१६ वायरलेस तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आसियान इंडिया म्युझिक फेस्टिवल २०२४ या महोत्सवात कला सादरीकरणांचा अफलातून मेळ साधला जाणार आहे. भारतातील आघाडीचे कलावंत आणि प्रतिभावान आसियान बॅण्ड्सची सादरीकरणे होणार आहेत, यातून वैविध्यपूर्ण सांगितिक परंपरांचा अनुभव घेण्याची अनोखी संधी रसिकांना मिळणार आहे. मोफत प्रवेश असणारा हा महोत्सव २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून पुराना किल्ला नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. भारतातील संगीत क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय गायकांमध्ये गणना होणारे रघू दीक्षित आणि शान पहिल्या दिवशी कला सादर करणार आहेत. ३० नोव्हेंबरलाही हाच उत्साह कायम राखत उत्साहाने सळसळणारा बॅण्ड वेस्टर्न घाट्स आणि जोरदार जोडी सुकृती-प्रकृती यांची सादरीकरणे होणार आहेत. त्यांच्या शैलींमुळे…
दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- एक भारतीय मल्टीनॅशनल कार्पोरेशन आणि सरकार व नागरिकांसाठी एक प्रमुख विश्वसनीय ग्लोबल टेकनिक-सक्षम सेवा प्रदाता बीएलएस इंटरनॅशनलने ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २५च्या दुस-या तिमाहीत संचालनातून होणारे कंपनीचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २१.४% वाढून ४९५.० कोटी रु. झाले आहे, जे आर्थिक वर्ष २४च्या दुस-या तिमाहीमध्ये ४०७.७ कोटी रु. होते. ही वाढ मुख्यतः व्हिसा आणि कॉन्स्युलर बिझनेसमुळे झाली आहे, ज्याच्या उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २९.६% वाढ झाली आहे. कंपनीचा एबिटा या तिमाहीत वाढून १६४.० कोटी रु. झाला आहे. जो…
