दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरवले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. 25 जानेवारीपासून पुन्हा अंतरवालीला आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Breaking
- बारामती विमानतळावर भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक घटनाक्रम
- गणेश जयंतीनिमित्त बांबवडेत कार्यक्रम उत्साहात संपन्न.
- मंगलदास मार्केट,काळबादेवी मध्ये बेकायदेशीर क्रॅश लॉटरी व कच्चा चिठ्ठीचे दुकाने थाटली.
- मेंदूच्या आजाराने ग्रस्त १७ वर्षीय तरुणीचा रुग्णालयात मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा आक्रोश
- पुण्यात खळबळ! नाईट शिफ्टवरून घरी परतलेल्या मुलाला दिसले आई-वडील मृतावस्थेत; कोंढव्यातील दुर्दैवी घटना
- राष्ट्रवादीशी संबंधित फर्मला गुन्हे शाखेने “भेट दिल्याने” राजकीय अटकळांना उधाण आले आहे………
- ब्रीच कँडी फ्लॅटमधून १५.४० लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ट्रॉफी चोरल्याप्रकरणी ओडिशातील एका घरगुती नोकराला गामदेवी पोलिसांनी अटक केली.
- “भ्रष्ट माणसांच्या हातात मुंबई देऊ नका”; तेजस्विनी पंडितचे मतदारांना कळकळीचे आवाहन

