दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरवले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. 25 जानेवारीपासून पुन्हा अंतरवालीला आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Breaking
- नोकरीवरून काढले म्हणून कर्मचाऱ्याने ऑफिसच्या गेटवरच केली काळी जादू
- नागपूरवासीय दुबई सिटी कार्निव्हलचा आनंद घेत आहेत, विमान हे आकर्षणाचे केंद्र…
- नागपूरमध्ये स्कूटरच्या ट्रंकमध्ये एवढी रोकड सापडली की अधिकारी चक्रावून गेले, तपासादरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना पकडले.
- धारावी-माहीम जंक्शन येथे पहाटे झालेल्या अपघातात ट्रेलरसह 5 वाहनांचे नुकसान झाले, कोणतीही जीवितहानी झालेली नाही…
- ‘फक्त मराठी’ बोलल्यानं फळ विक्रेत्याशी बाचाबाची, मुंब्रामध्ये जमावाने तरुणाला माफी मागायला लावली; व्हायरल व्हिडिओवर मनसेची प्रतिक्रिया…
- देव तारी त्याला कोण मारी ! हरिनामाचा जप करताना वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका; अंत्यविधीची तयारी.. अन् मृतदेह घरी नेताना ॲम्बुलन्स स्पीड ब्रेकरवर जोरात आदळली अन् आजोबा झाले जिवंत
- यंदा वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवाद्यांचा खात्मा, त्यापैकी 60% होते पाकिस्तानी!
- वर्सोवा किनाऱ्यावर चिनी जहाजाच्या धडकेने फिशिंग ट्रॉलर बुडाला; क्रूची सुखरूप सुटका करण्यात आली…